उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हयातील-2017-18 आणि 2018-19 मधील खरीप हंगामातील,दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता दहावी, इयत्ता बारावीच्या परीक्षा शुल्क माफीस पात्र तथापि, अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही,अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा,उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन पुण्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

 अवेळी पावसामुळे 2019-20 मध्ये बाधित क्षेत्रातील इयत्ता दहावी, इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा,उच्च माध्यमिकशाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे.

   याबाबतची तपशीलवार माहिती मंडळाच्या http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर आहे. इयत्ता दहावीसाठी ‘http://feerefund.mh-ssc.ac.in’ व इयत्ता बारावीसाठी “http://feerefund.mh-hsc.ac.in’ ह्या लिंकवर प्रसिध्द करण्यात आली आहे.


 
Top