उस्मानाबाद / प्रतिनिधी:

उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील अर्थसंकल्पात दुरुस्तीची कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. 30 कोटी 60 लाखाच्या कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यानी दिली आहे. या शिवाय भिकार सारोळा आरणी ते खामगाव रोड बांधण्यासाठी दिड कोटी मंजुर करण्यात आले आहेत. 

उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील मस्सा-मोहा-गोविंदपुर रस्ता सूधारण्यासाठी चार कोटी रुपये,उस्मानाबाद तालुक्यातील पिंप्री गोडाऊन ते राघुचीवाडी रस्ता सूधारणा करणे यासाठी एक कोटी, कळंब ढोकी रस्त्याची कळंब शहरातील काँक्रिट रस्त्यासह सुधारणा करण्यासाठी चार कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील बावी ते धारुर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तीन कोटी रुपये देण्यात आले आहेत. राज्य मार्ग ते देवधानोरा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी दोन कोटी रुपये, कळंब मोहा येडशी रस्त्याची सुधारणा करणे एक कोटी रुपये, खेड ते खेडपाटी रस्त्याची सुधारणा करणे 40 लाख रुपये, मंगरुळ गावातील काँक्रिट रस्ता व नाली बांधणे दोन कोटी रुपये, ईटकुर हासेगाव रस्त्याची सुधारणा करणे तीन कोटी 60 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौक ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, बार्शी वळण रस्त्यामध्ये काँक्रिट गटार बांधकाम करण्यासाठी चार कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. कावळेवाडी गावाजवळ पुलाचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी 80 लाख रुपये देण्यात येणार आहेत. 

मस्सा ते मोहा रस्ता मोहा गावाजवळील पूल बांधणे आदी कामासाठी एक कोटी 17 लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. येरमाळा येथे नवीन शासकीय विश्रामगृह बांधकामासाठी दोन कोटी 63 लाख रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या सर्व कामासाठी निधीची तरतुद करण्यात आल्याने लवकरच ही कामे मार्गी लागणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यानी व्यक्त केला आहे.मतदारसंघातील ग्रामीण तसेच शहरातील  पायाभुत सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने मागणी केलेल्या कामांना तत्काळ मंजुरी दिली आहे.त्याबद्दल मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आमदार पाटील यानी आभार व्यक्त केले आहेत.

 
Top