तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील दलित वस्तीत अनेक नळाला पाणी येत नसल्यामुळे ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे तेर ग्रामपंचायतला दिला आहे.

निळा झेंडा ते साठे नगर नळयोजना चालू असून सहा दिवसाआड पाणी कमी दाबाने सोडत असल्याने या भागातील नळधारकास पाणी मिळत नाही ब-याच वेळा तोंडी व लेखी निवेदन देऊनही पाणी प्रश्र्न सुटत नसल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत.दलित वस्तीत भरपूर पाणी नाही सोडल्यास तेर ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा विलास रसाळ व नागरीकानी निवेदनाद्वारे तेर ग्रामपंचायतला दिला आहे.


 
Top