उस्मानाबाद / प्रतिनिधी  -

भाजपा जिल्हयाच्या वतीने सोमवार दि. १५ फेबुवारी रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा व लोकांना वीज बिलात सवलत मिळावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. 

सकाळी ११ पासून ते ४ वाजेपर्यंत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला. आंदोलनापुर्वी तुळजाभवानीची महाआरती करण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात रामदास कोळगे, कैलास शिंदे, दत्ता सोनटक्के, अॅड. खंडेराव चौरे, ज्ञानदेव राजगुरू, तानाजी पाटील, लिंबराज साळुंके, संजय दळवे, अॅड. आंबेकर, नितीन काळे, राजाभाऊ पाटील आदींनी भाग घेतला. 

 
Top