निजामकालीन पत्रकारांने शिर्षक निजामाचे तर मुद्दे मराठवाडयाच्या हिताचे आशा बातम्या करीत होते. अनंत भालेराव यांनी मराठवाडयाच्या मुक्तीसंग्रामानंतर मत -मतांतरे, वार्तावर बोलने, आशा- अाकांक्षा समजुन घेण्याचे काम केले. व्यापक चर्चा घडवून आणल्या परंतू सध्याच्या काळात व्यापक चर्चा बंद झाल्या.प्रसिध्द साहित्यीक नरहर कुरूंदकर यांच्या साहित्याचा दाखला आजपर्यंत दिला जात आहे. या नव्या काळात कुरूंदकर सारखे साहित्यीक का निर्माण झाले नाहीत ? त्यामुळे साहित्यीक म्हणून कुरूंदकर किती वर्ष सांगावे लागेल? असा प्रश्न जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी उपस्थित केला. दरम्यान, मंगळवारी (दि.५) दुपारी समर्थ हॉटेलच्या सभागृहात झालेल्या उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने आवश्यक विषयांचे प्राधान्यक्रम ठरवून ते मांडावेत. त्याची दखल घेत प्रशासनही आपल्या पातळीवर त्याच्या सोडवणुकीसाठी पुढे असेल. शेत रस्ते, गाव तिथे पाणवठा, गाव तिथे देवराई यांसह विविध कामांच्या माध्यमातून विकासाचा रथ पुढे नेऊ. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सचिव भीमाशंकर वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार अनंत आडसूळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या शहरातील पत्रकारांचा नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी विमा उतरविला होता.
या विम्याचे वाटपही यावेळी करण्यात आले. याबद्दल नगराध्यक्ष मकरंदराजे यांचे बंधू चित्रसेन राजेनिंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यात शेत रस्ते, गाव तिथे पाणवठा, गाव तिथे देवराई, पुरातन स्थळांचा विकास, स्थानिक गरजानुरूप मूलभूत विकासकामे यासाठी आगामी काळात काम करण्याचे नियोजन आहे. गावातील विविध व्यावसायिकांची क्रयशक्ती टिकण्याबरोबरच वाढण्याची गरज आहे. पत्रकार आणि प्रशासनाने त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फड यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिला बालकल्याण, शिक्षण, आरोग्य या विभागांच्या माध्यमातून जनसेवक म्हणून जनतेची सेवा करण्याचे आवाहन केले. प्रारंभी उस्मानाबाद येथील नंदकिशोर भन्साळी तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पत्रकार संघाचे उपाध्यक्ष देविदास पाठक, रवी केसकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राहुल कुलकर्णी, काकासाहेब कांबळे, चेतन धनुरे, बाबुराव चव्हाण, विकास सुर्डी, सयाजी शेळके, कमलाकर कुलकर्णी, राकेश कुलकर्णी, रवी केसकर, अमोल गाडे, देविदास पाठक, राजा वैद्य, संतोष हंबीरे, बाळासाहेब माने, गोविंद पाटील बालाजी निरफळ, ज्ञानेश्वर पतंगे, बालाजी सुरवसे, प्रशांत कावरे, अजहर शेख, मल्लिकार्जुन सोनवणे, मच्छिंद्र कदम, प्रा. अभिमान हंगरकर, सुधीर पवार यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक-नारीकर, महेश पोतदार, विठ्ठल पाटील, छायाचित्रकार कालिदास म्हेत्रे, आरिफ शेख, इस्माईल सय्यद,सागर काळे,सलिम पठाण, संतोष खुणे, पांडुरंग मते, प्रभाकर लोंढे आदी उपस्थित होते.
