उमरगा / प्रतिनिधी

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात लढा देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगून उमरगा-तुळजापूर ते मुंबई असा पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरुणांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासंदर्भात शासन करत असलेल्या कार्याची माहिती दिली.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्याची मागणी उमरगा तालुक्यातील युवकांनी पायी प्रवास करून मुख्यमंत्री यांची भेट घेवून निवेदन देत मराठा आरक्षण बाबत चर्चा केली.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले हे सरकार तुमचेच असून तुमच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील बाळासाहेब माने, पंकज जगताप, अक्षय गायकवाड, साहेब जाधव, नितीन जाधव, विश्वजीत चुंगे या युवकांनी उमरगा ते मुंबई असा ३८० किलोमीटर प्रवास पायी केला, यासाठी त्यांना १३ दिवस लागले. तेराव्या दिवशी मुख्यमंत्र्यां ची वर्षा निवास्थानी भेट घेऊन निवेदन सुर्पूत केले. त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व युवकांची आस्थेवाईकपणे चौकशी करत मराठा आरक्षणाच्या संदर्भात शासनाने केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली असल्याचे युवकांनी सांगितले. 

 
Top