उस्मानाबाद/ प्रतिनिधी

मांजरा धरण या वर्षी शंभर टक्के भरल्याने प्रकल्पातील जलाशयाची पाहणी व विधिवत पूजा करून जलपूजन उस्मानाबाद   लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, कळंब-उस्मानाबाद चे आ.कैलास घाडगे-पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे आदींच्या हस्ते संपन्न झाले.

या धरणातून लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील काही गावांनाची धरणातून तहान भागवली जाते. पाणी वाया जावू नये यासाठी आवश्यक बाबी तात्काळ करण्यात याव्यात. तसेच सर्वांनी पाण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांनी केले.

यावेळी चत्रभुज काका टेळे, सुधाकर टेळे, नानासाहेब टेळे, परमेश्वर टेळे, पत्रकार राजेश मुंदडा, रत्नण माळकर, कोथळाचे सरपंच दिपक जाधव, हिंगणगावचे उपसरपंच प्रकाश अभंग, डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, माजी सरपंच शेषराव टेळे,  मधुकर टेळे, शरद टेळे, अनंत जाधव, विष्णू इरकर,दादा टेळे, मांजरा धरणाचे शाखा अभियंता श्री.पाटील, बाळासाहेब काळे,अमर टेळे, महादेव मस्के, उत्तम थोरात, नागेश पाटील, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top