तेर /प्रतिनिधी-
आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे चार गाव पाणिपुरवठा चालु करण्यात आला आहे. तेर, ढोकी, कसबे तडवळे व येडशी चार गाव पाणीपुरवठा योजनेची ग्रामपंचायतकडील असलेल्या थकबाकीमुळे ३ ऑगस्ट २०२० रोजी पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच आ.राणाजगजितसिंह पाटील यानी कार्यकारी अभियंता (मजिप्रा) यांना सद्य परिस्थिती अवगत करून या गावांचा पाणी पुरवठा पुनश्च सुरु करण्याबाबत सुचना दिली होती.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा ने आजपासून पाणीपुरवठा पुन्हा सुरु करण्याचे आदेश काढले आहेत. नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे चार गाव पाणिपुरवठा चालु करण्यात आला आहे. तेर, ढोकी, कसबे तडवळे व येडशी चार गाव पाणीपुरवठा योजनेची ग्रामपंचायतकडील असलेल्या थकबाकीमुळे ३ ऑगस्ट २०२० रोजी पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच आ.राणाजगजितसिंह पाटील यानी कार्यकारी अभियंता (मजिप्रा) यांना सद्य परिस्थिती अवगत करून या गावांचा पाणी पुरवठा पुनश्च सुरु करण्याबाबत सुचना दिली होती.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा ने आजपासून पाणीपुरवठा पुन्हा सुरु करण्याचे आदेश काढले आहेत. नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.