उस्मानाबाद / प्रतिनिधी
 कोविड- १९ च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक शाखेच्या सहकार्याने दि. १२ रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायद्यांतर्गत १८२ कारवायांमध्ये संबंधित वाहनधारकांकडून ६७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 
Top