उस्मानाबाद / प्रतिनिधी
कोविड- १९ रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश आहेत. असे असतानाही या मनाई आदेशांचे उल्लंघन करून दि. ११ रोजी दुकान, टपरी उघडणाऱ्या तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. यामध्ये पठाण महेबुब खान (रा. खाजानगर) ‘केजीएन पान शॉप’, तानाजी वसंत जठार (रा. गणेशनगर) भवानी मटन शॉप हे दुकान तर महेबूब अत्तार शेख, (रा. उमरगा) यांनी पानटपरी उघडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

 
Top