उस्मानाबाद /प्रतिनिधी-
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी 1959 ला उस्मानाबाद शहरात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची स्थापना करून या मातीतल्या अनेक गोर, गरिब विद्याथ्र्यांना शिक्षण दिले आहे. या महाविद्यालयाला यशाची परंपरा आहे. महाविद्यालयाचा नावलोकिक आहे. आज मला बोलावलात व माझा सत्कार केलात त्यामुळे मला आनंद झाला आहे.राजकारणी यांचेकडे चांगला दृष्टीकोण ठेवावा व आजच्या विद्याथ्र्यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी व जीवन स्वालंबी बनवायचे असेल तर आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्याथ्र्यांनी प्रचंड अभ्यास करून गुणवत्ता संपादित करावी,आज देशाला चांगल्या अधिकारी यांची गरज आहे, त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी—विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर गेले पाहिजे असे प्रतिपादन उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या दि.14 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या "यशवंत गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात" प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित खासदार म्हणून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा संस्था व महाविद्यालयाच्या वतिने प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उस्मानाबाद —कळंब विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार कैलास पाटील यांचाही सत्कार प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.जयसिंगलाव देशमुख यांची 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाच्या स्वागत मंडळ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ होते यावेळी नानासाहेब पाटील (माजी नगराध्यक्ष),प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख,माजी प्राचार्य डॉ.रमेश दापके,माजी प्राचार्य चौधरी,लॉ.कॉलेजचे प्र.प्राचार्य कठारे,प्राचार्या डॉ.सुलभा देशमुख हे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी डॉ.बापूजी साळुंखे व श्री स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन केले.
पुढे बोलतांना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले की,गुणवत्तेत मुलीच पुढे आहेत आता मुलांनी ही पुढे आले पाहिजे या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून समस्या सोडवणे माझे काम आहे.पराभूत झाल्यानंतरही मी खचलो नाही आता खासदार झालो आहे माणसं कशी बदलतात हे मला माहित आहे.उस्मानाबाद येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे याला विद्यापीठाचा दर्जा मिळवून दिल्याशीवाय मी शांत बसणार नाही .
यावेळी प्रस्ताविक करतांना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की डॉ.बापूजी साळुंखे यांनी जे आमच्यावर संस्कार केले आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांना आम्ही घडवत आहोत.या महाविद्यालयाची यशाची परंपरा आम्ही कायम राखली आहे आशा यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा यासाठीच समारंभ आयोजित केला आहे.यावेळी आमदार कैलास पाटील मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की मी आमदार आहे माझा सत्कार केलात त्याबद्दल आपले धन्यवाद महाविद्यालयाला जी मदत करता येईल ती करायला तयार आहे.
अध्यक्षीय समारोप करतांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरचे अर्थसहसचिव मा.प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ म्हणाले की,आमच्या संस्थेचे डॉ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची ज्ञानगंगोञी राज्यातील वाड्या,वस्तीवर पोहचवली व गोर,गरिबांच्या युवकांना संस्कार दिले आज संस्थेच्या माध्यामातून आम्ही लाखो सुसंस्कारित युवक घडवत आहोत देशाला गांधीजी मिळाले उस्मानाबादला डॉ.बापूजी साळुंखे मिळाले डॉ.बापूजींच्या स्वप्नातील युवक म्हणजे गांधीवादी व्यक्तीमत्व असणारे नानासाहेब पाटील हे विद्यार्थी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाने दिले या महाविद्यालयाने अनेक गुणवंत व क्रक्रीडा क्षेञात अनेक पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी दिले डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात आपली गुणवत्ता कायम राखली.उस्मानाबादला तरूण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर मिळालेत आमदार तरूण कैलास पाटील मिळालेत उद्याचं देशाचं उज्वल भविष्य या तरून लोकप्रतिनिधित दिसतं आहे.आम्हाला नैराश्य असलेल्या शेतक—यात व त्यांच्या तरूण युवकात उत्सास निर्माण करण्यासाठी ताकद द्यायची आहे.हि ताकद देण्यासाठीच प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख व त्यांचे गुरूदेव कार्यकर्ते अरोराञ झटत आहेत.
यावेळी 11वी ते एम.ए.पर्यंतच्या गुणवंत (18—19) शै.वर्षातील, एन.सी.सी व एन.एस.एस.आणि क्रक्रीडा विभागातील यशवंत अशा 50 विद्यार्थी व विद्यार्थिनी व पालकांचा प्रमुख मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.सूञसंचालन डॉ.केशव क्षीरसागर यांनी केले आभार प्रा.पी.डी.क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र.प्राचार्य बबन सुर्यवंशी ,प्रभारी प्राचार्य डॉ.ए.बी.इंदलकर,प्रा.डॉ.विद्या देशमुख,प्रा.राजा जगताप,प्रा.आतुल देशमुख,प्रा.हनुमंत साळुंखे,प्रा.संदिप देशमुख,प्रा.बाबासाहेब मोरे,यांनी प्रयत्न केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी,पालक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी 1959 ला उस्मानाबाद शहरात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची स्थापना करून या मातीतल्या अनेक गोर, गरिब विद्याथ्र्यांना शिक्षण दिले आहे. या महाविद्यालयाला यशाची परंपरा आहे. महाविद्यालयाचा नावलोकिक आहे. आज मला बोलावलात व माझा सत्कार केलात त्यामुळे मला आनंद झाला आहे.राजकारणी यांचेकडे चांगला दृष्टीकोण ठेवावा व आजच्या विद्याथ्र्यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी व जीवन स्वालंबी बनवायचे असेल तर आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्याथ्र्यांनी प्रचंड अभ्यास करून गुणवत्ता संपादित करावी,आज देशाला चांगल्या अधिकारी यांची गरज आहे, त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी—विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर गेले पाहिजे असे प्रतिपादन उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या दि.14 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या "यशवंत गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात" प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित खासदार म्हणून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा संस्था व महाविद्यालयाच्या वतिने प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उस्मानाबाद —कळंब विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार कैलास पाटील यांचाही सत्कार प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.जयसिंगलाव देशमुख यांची 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाच्या स्वागत मंडळ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ होते यावेळी नानासाहेब पाटील (माजी नगराध्यक्ष),प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख,माजी प्राचार्य डॉ.रमेश दापके,माजी प्राचार्य चौधरी,लॉ.कॉलेजचे प्र.प्राचार्य कठारे,प्राचार्या डॉ.सुलभा देशमुख हे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी डॉ.बापूजी साळुंखे व श्री स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन केले.
पुढे बोलतांना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले की,गुणवत्तेत मुलीच पुढे आहेत आता मुलांनी ही पुढे आले पाहिजे या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून समस्या सोडवणे माझे काम आहे.पराभूत झाल्यानंतरही मी खचलो नाही आता खासदार झालो आहे माणसं कशी बदलतात हे मला माहित आहे.उस्मानाबाद येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे याला विद्यापीठाचा दर्जा मिळवून दिल्याशीवाय मी शांत बसणार नाही .
यावेळी प्रस्ताविक करतांना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की डॉ.बापूजी साळुंखे यांनी जे आमच्यावर संस्कार केले आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांना आम्ही घडवत आहोत.या महाविद्यालयाची यशाची परंपरा आम्ही कायम राखली आहे आशा यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा यासाठीच समारंभ आयोजित केला आहे.यावेळी आमदार कैलास पाटील मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की मी आमदार आहे माझा सत्कार केलात त्याबद्दल आपले धन्यवाद महाविद्यालयाला जी मदत करता येईल ती करायला तयार आहे.
अध्यक्षीय समारोप करतांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरचे अर्थसहसचिव मा.प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ म्हणाले की,आमच्या संस्थेचे डॉ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची ज्ञानगंगोञी राज्यातील वाड्या,वस्तीवर पोहचवली व गोर,गरिबांच्या युवकांना संस्कार दिले आज संस्थेच्या माध्यामातून आम्ही लाखो सुसंस्कारित युवक घडवत आहोत देशाला गांधीजी मिळाले उस्मानाबादला डॉ.बापूजी साळुंखे मिळाले डॉ.बापूजींच्या स्वप्नातील युवक म्हणजे गांधीवादी व्यक्तीमत्व असणारे नानासाहेब पाटील हे विद्यार्थी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाने दिले या महाविद्यालयाने अनेक गुणवंत व क्रक्रीडा क्षेञात अनेक पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी दिले डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात आपली गुणवत्ता कायम राखली.उस्मानाबादला तरूण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर मिळालेत आमदार तरूण कैलास पाटील मिळालेत उद्याचं देशाचं उज्वल भविष्य या तरून लोकप्रतिनिधित दिसतं आहे.आम्हाला नैराश्य असलेल्या शेतक—यात व त्यांच्या तरूण युवकात उत्सास निर्माण करण्यासाठी ताकद द्यायची आहे.हि ताकद देण्यासाठीच प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख व त्यांचे गुरूदेव कार्यकर्ते अरोराञ झटत आहेत.
यावेळी 11वी ते एम.ए.पर्यंतच्या गुणवंत (18—19) शै.वर्षातील, एन.सी.सी व एन.एस.एस.आणि क्रक्रीडा विभागातील यशवंत अशा 50 विद्यार्थी व विद्यार्थिनी व पालकांचा प्रमुख मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.सूञसंचालन डॉ.केशव क्षीरसागर यांनी केले आभार प्रा.पी.डी.क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र.प्राचार्य बबन सुर्यवंशी ,प्रभारी प्राचार्य डॉ.ए.बी.इंदलकर,प्रा.डॉ.विद्या देशमुख,प्रा.राजा जगताप,प्रा.आतुल देशमुख,प्रा.हनुमंत साळुंखे,प्रा.संदिप देशमुख,प्रा.बाबासाहेब मोरे,यांनी प्रयत्न केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी,पालक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.