उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्हयातील पक्षांतरामुळे जिल्हयात पक्ष संपला आपल्या कोणी चहा प्यायला पाहुने तरी बोलावतील का? असे म्हणत शरद पवार यांनी डॉ.पद्मसिंह पाटील पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा खरपूस समाचार घेत पुर्वीपासून असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस‘या बालेकिल्यात आपली पवार दाखवून दिली.
उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस‘या वतीने मंगळवारी कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. यावेही ते बोलत होते. मेळाव्यास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. विक्रम काळे, जीवनराव गोरे, एस.पी.शुगर्सचे चेअरमन सुरेश पाटील, पुर्व नगराध्यक्ष अमित शिंदे, सक्षणा सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना राष्ट्रवादीचे नेते श्री. पवार म्हणाले की,  सर्व जिल्हयात जावून पुन्हा एकदा नव्या पिढींशी संवाद साधून विचारांची पेरणी करण्यासाठी रा’यभर फिरत आहे. उस्मानाबादमध्ये राजकीय भूकंप झाल्याची बातमी वाचली. पक्षातंर करणा-यांन सोलापूरमध्ये भाजप अध्यक्षांचेच पाय धरले. त्यामुळे स्वाभिमान काय असतो ? स्वाभिमानाची व्याख्या बदलावी लागते की काय ? असे म्हणत श्री. पवार यांनी राणाजगजितसिंह पाटील यां‘यावर टीका केली. यावेळी त्यांनी माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यां‘यावरही निशाणा साधला ते म्हणाले की, यांना थेट जिल्हा परिषद सभापती पदाची खूर्ची दिली. त्यानंतर 40 ते 45 वर्ष यांची सत्तेची गाडी कधी थांबली नाही. एखादा गडी तर निवडूण न येताच मंत्री होउन बसला, असे म्हणत त्यांनी पाटील पिता-पुत्रावर जोरदार टिका केली. या भागातील शेतक-यांसह सर्वसामान्यांना सन्मानाने जगता यावे, ही आमची भूमिका होती. उस्मानाबाद शहरासाठी 114 किमीवरून उजनी धरणातून पाणी आणायचे होते. परंतु नियम नव्हता. त्यास बगल देवून आम्ही पाणी दिले. यावेळी त्यांनी भाजप सरकारवही जोरदार टीका केली. इतिहासाचे स्मरण ठेवून महाराष्ट्रात परिवर्तन घडवा, असे आवाहन श्री. पवार यांनी जनतेला केले.

 
Top