प्रतिनिधी/ तुळजापूर
पंचवीस वर्षापूर्वी राज्यात नदीजोड संकल्पना अस्तित्वात आणली असती तर राज्यात, मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती उद्भवली नसती, असे सांगुन राज्यातील इरेगेशन वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीशी बोलणार असल्याची माहीती केंद्रीय सामाजिक राज्यमंञी रामदास आठवले यांनी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दुष्काळ पाहणी दौ-यात पञकारांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मराठवाडा विर्दभात दुष्काळ परिस्थिती भयानक असुन मराठवाड्यातील इरेगेशन वाढल्या शिवाय दुष्काळ कायम स्वरुपी निर्माण होणारी दुष्काळ परिस्थिती दूर होणार नाही सध्या राज्ययात अवघे पंधरा टक्के इरेगेशन असुन आजपर्यत ते सत्तर टक्के पर्यत जाणे गरजाचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नदीजोड संकल्पना पन्नास वर्षा पुर्वी मांडली होती. ती अस्तित्वात न आल्याने आज महाराष्ट्रात दुष्काळ निर्माण झाला.
मुंबई व कोकण किनारपट्टीवरील वाहुन जावुन समुद्रास मिळणारे पाणी जर मराठवाडयास विदर्भास दिले गेले तर या दोन विभागातील दुष्काळ निर्माण होणार नाही, असे यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीत महायुती ३७ जागा मिळतील, असे सांगुन लोकसभा निवडणूक आचार संहिता संपताच आमच्या जिल्हयातील प्रत्येकी दोन कार्यकत्र्यांची महामंडळावर नियुक्ती होईल, असे सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपा सेना आरपीआय आठवले गट युती झाली तरच सत्तेवर येईल असे स्पष्ट केले.तसेच विधानसभासाठी आम्ही आठ ते दहा जागा व एक मंञीपद व चाळीस ते पंचचाळीस कार्यकर्तांना महामंडळावर नियुक्ती अशी मागणी करणार असल्याचे यावेळी म्हणाले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, प्रदेश महासचिव संजय बनसोडे, तानाजी कदम यांच्या सह रिंपाईचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
पंचवीस वर्षापूर्वी राज्यात नदीजोड संकल्पना अस्तित्वात आणली असती तर राज्यात, मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती उद्भवली नसती, असे सांगुन राज्यातील इरेगेशन वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीशी बोलणार असल्याची माहीती केंद्रीय सामाजिक राज्यमंञी रामदास आठवले यांनी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दुष्काळ पाहणी दौ-यात पञकारांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मराठवाडा विर्दभात दुष्काळ परिस्थिती भयानक असुन मराठवाड्यातील इरेगेशन वाढल्या शिवाय दुष्काळ कायम स्वरुपी निर्माण होणारी दुष्काळ परिस्थिती दूर होणार नाही सध्या राज्ययात अवघे पंधरा टक्के इरेगेशन असुन आजपर्यत ते सत्तर टक्के पर्यत जाणे गरजाचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नदीजोड संकल्पना पन्नास वर्षा पुर्वी मांडली होती. ती अस्तित्वात न आल्याने आज महाराष्ट्रात दुष्काळ निर्माण झाला.
मुंबई व कोकण किनारपट्टीवरील वाहुन जावुन समुद्रास मिळणारे पाणी जर मराठवाडयास विदर्भास दिले गेले तर या दोन विभागातील दुष्काळ निर्माण होणार नाही, असे यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीत महायुती ३७ जागा मिळतील, असे सांगुन लोकसभा निवडणूक आचार संहिता संपताच आमच्या जिल्हयातील प्रत्येकी दोन कार्यकत्र्यांची महामंडळावर नियुक्ती होईल, असे सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपा सेना आरपीआय आठवले गट युती झाली तरच सत्तेवर येईल असे स्पष्ट केले.तसेच विधानसभासाठी आम्ही आठ ते दहा जागा व एक मंञीपद व चाळीस ते पंचचाळीस कार्यकर्तांना महामंडळावर नियुक्ती अशी मागणी करणार असल्याचे यावेळी म्हणाले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, प्रदेश महासचिव संजय बनसोडे, तानाजी कदम यांच्या सह रिंपाईचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
