कळंब (प्रतिनिधी)- “मन प्रसन्न असेल तरच जीवनात यशाची दारे उघडतात,” असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रदीप साळुंखे यांनी केले. शिव सेवा तालीम संघ यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
“मन करा रे प्रसन्न” या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, भौतिक प्रगतीसोबत तणाव, नैराश्य आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. मनावर नियंत्रण ठेवून जीवनातील दुःखाचे मूळ शोधण्याचा संदेश संत तुकाराम आणि गौतम बुद्ध यांनी दिला होता, याचा संदर्भ देत त्यांनी सकारात्मकता, सेवाभाव आणि चांगल्या कर्मांचे महत्त्व अधोरेखित केले. राग, अहंकार, द्वेष आणि मत्सर टाळून चांगल्या संगतीत राहिल्यास जीवन अधिक यशस्वी होते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास डॉ. माणिकराव डिकले, डॉ. रमेश जाधवर, डॉ. रमेश वाघ, डॉ. निळकंठ चोपणे, डॉ. अभय मनगिरे, डॉ. अमित पाटील, डॉ. अभिजीत लोंढे, डॉ. कोरसाळे, डॉ. कवडे, डॉ. दीपक कुंकुळोल, डॉ. अजित देशमुख, डॉ. काकाणी, डॉ. शिनगारे, डॉ. कल्याणकर, डॉ. बावळे, डॉ. सोनवणे, डॉ. भवर, डॉ. काकडे, डॉ. मुंडडा, प्राचार्य हेमंत भगवान, प्रा. सुनील पवार, अरविंद शिंदे, प्रा. कांबळे सर, प्रा. नरवडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य गपाट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुशील तीर्थकर, सचिव मनोज कदम, प्रा. संजय घुले, बापू कदम, शिवाजी कदम, आरेफभाई तांबोळी, विकास गडकर, नितीन गरड, अनिल पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले. प्रेरणादायी विचारांनी भरलेल्या या व्याख्यानामुळे उपस्थितांना सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याची नवी ऊर्जा मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
