धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्या शेती पिकांचे व गावातील घरांचे झालेले नुकसान पहाणी दौरा नुकताच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला असून शासनाने सर्व निकष शिथील करुन शेतकऱ्यांना व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नागरीकांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रीया माध्यमाशी बोलताना दिली.

ऑगस्ट व सप्टेंबर महिण्यात धाराशिव जिल्हयामध्ये अतिवृष्टीने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडत काढले असून मोठया प्रमाणात शेतीतील काढणी योग्य झालेल्या सोयाबीन, मुग, उडीद, यासह अन्य खरीप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याच बरोबर फळ पिकांचे देखील नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्हयातील सांगवी, कामेगाव, राजेबोरगाव, बोरखेडा, टाकळी, कनगरा आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेती पिकांचे पहाणी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी व शेतकऱ्यांना आसमानी संकटातून बाहेर येणेकरीता निकष शिथील करुन मोठया प्रमाणात मदत करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे प्रतीपादन माध्यमाशी बोलताना केले आहे.

धाराशिव तालुक्यातील वरील गावातील तेरणा नदीला आलेल्या पुराने नदीकाठचे जमीनीत खरडून जावून पिके संपुर्णत: नष्ट झाली आहे. मोठया कष्टाने उभा केलेले पिक पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकरी हतबल व निराश झाला आहे. या परिस्थीतीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून भरीव मदतीची आपेक्षा आहे. शेतकऱ्यांना या परिस्थितीत आपण वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. या पहाणी दरम्यान सांगवी, कामेगाव, राजेबोरगाव, बोरखेडा, टाकळी, कनगरा आदी गावातील शेतकरी, नागरीक मोठया प्रमाणात उपस्थीत होते.

 
Top