धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाला दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रे दिली जात नसल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातला.

धाराशिवमध्ये  शिंगोली रेस्ट हाऊसच्या बाहेरच मंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घालून आमचे प्रश्न सोडवा, मगच रेस्ट हाऊसमध्ये जा, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. जवळपास 10-15 मिनिटे आंदोलकांनी पालकमंत्र्याचा रस्ता अडवून धरला होता.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या यशानंतर ज्यांच्याकडे विहित पुरावे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. मात्र कागदपत्रे सादर करूनही सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विभागाअंतर्गत वैधता प्रमाणपत्रे दिली जात नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते.

 
Top