धाराशिव (प्रतिनिधी)- जीवन प्रणाली प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचलित मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य, यांच्याकडून संविधान निर्माण संचलन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्र विभागीय मानवतावादी साहित्य संमेलन सांगली येथे संपन्न झाले.
या संमेलनात धाराशिव येथील साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते व्ही.एस. गायकवाड, संमेलनाचे उद्घाटक जेष्ठ विचारवंत स.नि. पाटील मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रप्रकाश शिंदे, साहित्यिक सुरेखा कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार, स्मृतीचिन्ह, पुस्तके देवून सन्मान करण्यात आले. यापूर्वी विजय गायकवाड यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल राज्य पातळीवर व राष्ट्रीय पातळीवर विविध संस्थांनी सन्मान केला आहे. श्री. गायकवाड यांना यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप दिल्ली महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांचे विविध पुस्तकांच्या व वृत्तमानपत्रामध्ये ऐतिहासिक, संशोधनात्मक शोध निबंध प्रसिध्द झाले आहे. साप्ताहिक कांचीराम टाईम्स, क्रांतीफुले धग, रणकंदन, यशवंत, संघर्ष, आंबेडकरभवन वस्तुस्थिती, महामानव आंबेडकरी कवींचा अविष्कार, साहित्य उत्सव, युगप्रवतर्ग, दु:खानं गदगदलेलं झाड, जाणीव अस्मितेची, धम्मसार, महामानव बाबासाहेब आंबेडकर इत्यादी पुस्तकामधून व वृत्तमानपत्रातून त्यांचे साहित्य प्रसिध्द झाले आहे. या सत्कार सोहळयास झालेल्या कार्यक्रमास सरिता माने, अरुण कांबळे, सुजित कांबळे, डी.जी. वाळवंटे, राजु वाघमारे, सुनिल गायकवाड, आनंद चोपडे, अशोक पवार इत्यादींची उपस्थिती होती. व्ही.एस. गायकवाड यांच्या या सन्मानाबद्दल प्रभाकर बनसोडे, प्रा. कल्याण कांबळे, प्रा. अनंत लांडगे, प्रा. व्यंकट किर्तने, निरंजन माने, प्रताप सरवदे इत्यादी मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.