भूम (प्रतिनिधी)- शहरातील रवींद्र हायस्कूल येथे १९८७ - ८८ साली इयत्ता दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शुक्रवार (ता ८ ) रोजी कृष्णाबाई रेपाळ मंगल कार्यालय येथे स्नेहसंमेलन शालेय जीवनातील आठवणीना उजाळा देत उत्साहात पार पडले.शिक्षणाला जीवनात महत्वाचे स्थान असल्याने व अलीकडील धावपळीच्या काळात प्रत्येक विद्यार्थी हा माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर आपल्या सोयीनुसार पुढील उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात.मात्र शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या सोबत घडलेल्या प्रेतक गोष्टींना आणि त्या आठवणीना उजाळा देण्यासाठी एकत्र येऊन सर्वांशी हितगुज करण्यासाठी तब्बल ३६ वर्षांनी त्या वेळी इयत्ता दहावीत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून या स्नेह संमेलनाचे आयोजन केले होते.या वेळी सर्वांनी गप्पा गोष्टी करत त्या काळच्या आठवणीना उजाळा दिला व प्रत्येकाने एकमेकांची आपुलकीने विचारपूस केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली अपसिंगेकर यांनी केले.अतिशय आनंदी वातावरणात पार पडले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी आर डी सुळ होते .कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आले .त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून व कै .शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .उपस्थित शिक्षकांचा कृतज्ञ पर सत्कार करण्यात आला .त्यानंतर जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगत मधून
जुन्या आठवणींना उजाळा दिला .यावेळी सर्वांना आठवण म्हणून विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती भेट देण्यात आली .यावेळी
कैलास शेंडगे,नंदकुमार शिंदे ,राजेंद्र भोसले ,मोहम्मद चाऊस ,पप्पू घुले ,आबा उंबरे ,संजय गवळी ,उर्मिला लाखोळे ,मनीषा जवाहिरे,अंगद माळी ,अनिस मुजावर ,रुक्मिणी सुपेकर ,शंकर खराडे ,रमाकांत रणखांब ,संजय चौधरी ,राजकुमार वेदपाठक ,सुहास देशमुख ,सुरेखा माळी ,सचिन शेंडगे , श्रीकांत शेळके ,राजाभाऊ तळेकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते .