तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते गंजेवाडी या नविन तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची तीन महीन्यात दुरावस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता ठिक ठिकाणी उचकटला आहे. तर रस्त्यावर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते गंजेवाडी या रस्त्याचे तीन महीन्यापुर्वी दुरूस्तीचे काम करुन रस्ता तयार करण्यात आला होता. तोच रस्ता उचकटल्याने रस्त्यावर खड्डे पडत असुन निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तीन महीन्यातच रस्त्याची वाट लागत असल्याचे नागरीक सांगत आहेत. प्रत्येक वेळी तामलवाडी ते गंजेवाडी या रस्त्याची दुरावस्था होते. प्रत्येक वेळी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साधारणतः 30 लाख रुपये खर्च करून तुकड्या तुकड्यात रस्ता तयार करण्यात येतो. पहील्या वेळी थोडाफार रस्ता तयार करण्यात येतो. मात्र पुढल्या वेळेस पुढचा रस्ता मंजुर होईपर्यंत पहील्या वेळेस तयार केलेल्या रस्त्याची वाट लागलेली असते. मग पुन्हा तोच रस्ता दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात येतो म्हणजे  एक ते दोन कीलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी प्रत्येक वेळी निधी मंजूर करायचा ओबड धोबड काम करायचे अन्‌‍ मलीदा लाटायचा. यामुळे गेली अनेक वर्षांपासून तामलवाडी ते गंजेवाडी रस्त्याची दुरावस्था होत असुन आजतागायत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किती पैसा खर्च करण्यात आला याचा लेखा जोखा मांडुन लाखो रुपये खर्च करूनही हा रस्ता का दुरुस्त होत नाही. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य  यांनी लक्ष देण्याची गरज आहे. तीन महीन्यापुर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असुन रस्ता खचत आहे, ठिक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघुन खड्डे पडत असल्याचे दिसून येत आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाचा त्रास मात्र नागरीकांना सहन करावा लागत आहे. रस्ता तयार करताना ना रस्ता उकरला जातोय ना व्यवस्थित मुरुम टाकला जातोय. अशा पध्दतीने ओबड धोबड काम करुन संबंधित गुत्तेदार मलीदा लाटण्याचे काम करत असल्याचे नागरीकांमधुन बोलले जात आहे. रस्ता तयार करताना डांबराचा वापर कीतपत झाला आहे हे दिसून येत आहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुम टाकण्यात आलेला नाही. मुरूम टाकून साईड पट्ट्या तयार करण्यात आलेल्या नाहीत हे स्पष्टपणे दिसून येत आहे. तामलवाडी ते गंजेवाडी या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करुन व मुरुम टाकुन साईड पट्ट्या न करताच संबंधित गुत्तेदार गायब झाल्याने नागरीकांनामधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. याकडे संबंधित वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरीकांमधुन केली जात आहे.

 
Top