भूम (प्रतिनिधी)- भूम आगारातून जाणाऱ्या लांब पाल्याच्या एसटी बसेस दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने उशिरा धावत आहेत . प्रभारी आगार प्रमुखच्या डीसाळ नियोजनामुळे आगारांमधील नियोजन पूर्णपणे विस्कटले आहे .
लांब पाल्याच्या एसटी बर्सेस मध्येच बंद पडत आहेत .त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . स्थानकामध्ये प्रवासी दोन दोन तीन तीन तास एसटी येण्याची वाट बघत बसत आहेत .कोणत्या ना कोणत्या कारणाने दररोज एसटीचे वेळापत्रकाचे नियोजन कोलमडत आहे . मागील पाच महिन्यापासून कायमस्वरूपी आगर प्रमुख नसल्यामुळे आगारातील कारभार राम भरोसे चालू असल्याचे कर्मचाऱ्यांमधून दबक्या आवाजात चर्चा चालू आहे . भूम आगारात कायमस्वरूपी आगारप्रमुख देण्याची मागणी प्रवासी वर्ग मधून होत आहे .
तसेच दिनांक 30 मे रोजी गेलेल्या भूम कोल्हापूर या बस बाबत येताना बसेसचे दोन्हीही काच पुढील सर्व भाग चालत्या गाडीमध्ये अचानक गळून पडल्याने मोठा अपघात होताना वाचला याबाबत आगारात कार्यरत असलेले ए डब्लू एस वाहन परीक्षक यांचे लांब पल्ल्याच्या गाड्या जाताना गाड्याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते .काल दिनांक 31 मे रोजी भूम आगारातुन जाणाऱ्या वाशी भूम मुंबई या गाडीचा तर काल तर कहर झाला . ही गाडी जाताना भूम वाशी वेगळी गेली वाशी वरून भूमला तीच आली व भूमवरून मुंबईकडे जाताना हिरकणी बस गेली परंतु भूम शहरापासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावरती सदर 750 क्रमांकाची हिरकणी बस बंद पडली सदर गाडी एका जागेवरती अर्धा तास उभी होती त्यानंतर ती गाडी बदलून आली व हिरकणी ऐवजी 3097 ही साधी बस आली ही गाडी प्रवासी घेऊन निघणार पण तीही पंचर निघाली . यामुळे या गाडीतील प्रवाशांना तीनदा चढ-उतार करावा लागला सदर बस मध्ये वाशी भूम पाथरूड व खर्डा येथून 41 आरक्षणाचे प्रवासी होते .या प्रवाशांचे पैसे ऐसीयाड चे घेतले पण प्रवशांना साध्या गाडीत जावे लागले . घडलेल्या प्रकाराबद्दल प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे . आज रविवार रोजी येथून जाणाऱ्या वालवड पुणे व भोगलगाव पुणे या लांब पडल्याच्या बसेस संध्याकाळपर्यंत ही गेलेल्या होत्या यामुळे आज आगाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आगाराच्या चाललेल्या या रामभरोस कारभाऱ्यामुळे येथून प्रवास करणारी प्रवासी अवैध वाहतुकीकडे वळू लागले आहेत.