धाराशिव  (प्रतिनिधी)-पावसाळ्याच्या कालावधीत गाय व म्हैसवर्गीय पशुधनात घटसर्प, फऱ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची अधिक भीती असते. वेळीच उपचार न झाल्यास पशुधन दगावले जाऊ शकते. त्यामुळे हे आजार रोखण्यासाठी कृषि महाविदयालय आळणी येथील कृषिदूतांनी  पशुसंवर्धन विभाग तेर यांच्यासोबत लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

बहुतांश शेतकरी शेतीस जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. घटसर्प, फऱ्या, इव्हीटी, लम्पी स्कीन आजाराची लागण जनावरांना होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून हे लसीकरण केले जाते. खरिपाचा हंगाम सुरु होण्यास अजून अवधी असला तरीही पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढावी. तसेच पशू आजार उद्भवल्यास त्यावर मात करता यावी, म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम हाती घेण्यात येते. या मोहिमेअंतर्गत तीन महिन्यांपेक्षा जास्त वयोगटातील गाई, म्हशीच्या वासरांनादेखील लसीकरण करण्यात येते. 

तेरमध्ये मुख्यत घटसर्प या रोगावरील लसीकरण करण्यात आले.

या मोहिमेत शासकीय पशुवैद्यक  बी. एफ. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक हरि घाडगे, देवानंद शेटे, पशू वैद्यशास्त्र मार्गदर्शक रोहित इंगळे, सतीश दळवी तसेच कृषिदूत प्रणय कोकाटे, जगदिश बसाटे, रमण घोरपडे, अशोक यादव, अमोल मायकर, साहिल सांगुळे, संकेत सांगुळे यांचा समावेश होता. 


सर्व पशुपालकांनी आपल्या पशुंचे 

लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन कृषिदुतांच्या व  पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच यापुढे गावोगावी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याने सोय होणार आहे. जनावरांना धाप लागणे, चारा कमी खाणे, अशा प्रकारची लक्षणे जाणवल्यास पशुसंवर्धन दवाखान्यात जाऊन जनावरांना लस टोचून घेण्याचे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. 

 
Top