धाराशिव (प्रतिनिधी)- लेखनातून समाज परिवर्तनासाठी योगदान देण्याचं काम लेखकांनी आजपर्यंत केलं आहे आणि आजही ते करीत आहेत. त्यांच्या चिंतनाची दिशा तुमच्या आमच्यासारखी व्यवहारी कधीच नसते तर समाज हिताची वैचारिक विशालता त्यात असते असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी काढले. 

अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठक व गुणवंत सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. साहित्य भारतीच्या व बालकुमार वतीने जे काही साहित्यिक उपक्रम आयोजित केले जातात, अशा उपक्रमातूनच नवनवे लेखक निर्माण होतील आणि आजचे हे लहान लेखक उद्या खूप मोठे होतील. या प्रक्रियेत युवराज नळे यांच्या माध्यमातून कलाविष्कार अकादमी, साहित्य भारती व बालकुमार साहित्य संस्थांच्या वतीने  साहित्यिक व साहित्यिक संस्थांना दरवर्षी जे काही साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत ते सिद्धिविनायक परिवाराच्या वतीने प्रायोजित केले जातील असेही दत्ता कुलकर्णी यांनी जाहीर करून सर्व गुणवंत व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.

 
Top