धाराशिव (प्रतिनिधी)- येथील एका विवाहित महिलेस हुंड्यापोटी माहेरहून 20 लाख रूपये घेवून ये असा तगादा लावून शारिरीक व मानसिक छळ केल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. पती, सासू, दीर, नणंद व जाऊ हे 5 वर्षापासून तुला सोडून देवून तुझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न करीन, मारहाण करणे, गरोदरपणात वैद्यकीय सेवा नाकारल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे तिला 6 व 4 वर्षाच्या मुलांना हिसकावून घेवून घराबाहेर हाकलून दिले आहे. आनंद नगर पोलिस ठाण्यातमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समता कॉलनीतील भाग्यनगर ह. मु. हॉटेल किंगच्या पाठीमागे येथे राहणाऱ्या फरिया याचे अजीम शेख यांच्याबरोबर 2017 साली लग्न झाले. 2019 पासून सासू रूक्साना तबसम, दीर मो. अर्शद, जाऊ आस्मा समरिन उर्फ सना तसेच नणंद फरहीन मुजाहिद काझी हे विवाहिता फरिया शेख यांना तुझ्या वडिलांकडून 20 लाख रूपये घेवून ये असे म्हणत गेल्या 5 वर्षापासून मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत. त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने आंनद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.