भूम (प्रतिनिधी)-समाजातील गरीब - श्रीमंताची दरी दूर झाली,  समाजाला चांगल्या स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे समाजाची प्रगती होऊ शकते, यासाठी युवकांनी चळवळीत सामील होणे गरजेचे आहे, समाजासाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे असे मत ऑल इंडिया देवांग देवांगन कोष्टी कोष्टा फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव विधीज्ञ सचिन देवांग यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले . 

रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी श्री चौंडेश्वरी मंदिर मध्ये कोष्टी समाज ट्रस्ट व तरुण एकता मंडळाच्या पुढाकाराने इयत्ता 10 व 12 वी व पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थी , शासकीय सेवेत नव्याने दाखल झालेले, सेवेततील पदोन्नती मिळालेले कर्मचारी, आदर्श कर्मचारी यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला.

यावेळी समाज चळवळीतील राष्ट्रीय सचिव विधीज्ञ सचिन देवांग यांनी प्रत्येक समाजाचे महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ आहेत. त्या तुलनेत कोष्टी समाज बांधवाचं देखील शक्तिपीठ असावं यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्य स्तरावरचा महामेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यातून शक्तिपीठाचा मार्ग काढला जाणार आहे, एवढेच नव्हे तर 7 ऑगस्ट 2026 रोजी शुभारंभ केला जाणार आहे. त्या अनुषंगाने ध्वजाच  देखील अनावरण झालेलं आहे,  यापुढील काळात युवा, युवतीने समाज संघटनेसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यातला थोडा तरी वेळ द्यावा. शासकीय स्तरावर उच्च पदस्थ अधिकारी होण्याची संधी मिळालेली आहे त्यांनी देखील समजासाठी थोडा वेळ द्यावा असेही आवाहन केले.

या कार्यक्रमातून इयत्ता 10 वी  व 12 वी तसेच विविध शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय सेवेतील पदोन्नती मिळालेले कर्मचारी, आदर्श शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक गरजू विद्यार्थ्यांना व्ही बी सदानंदे यांच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक साहित्याचे मुबलक वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमासाठी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे डिन डॉ. दिगंबर धर्मराज दाते, राज्य पुरस्कार प्राप्त समाजसेवक संदीप बागडे, श्रीकांत खामकर, आदर्श शिक्षिका सौ मनीषा ज्ञानेश्वर टकले, सौ उषा महादेव आसलकर, सौ मनीषा राजेंद्र बागडे, ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रकाश बागडे यांची प्रमुख उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमासाठी श्री देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे,  उपाध्यक्ष श्याम तुकाराम वारे, सचिव शंकर विठ्ठल खामकर, सदस्य योगेश ज्ञानेश्वर आसलकर, सागर एडवा टकले,  गंगाराम बापूराव भागवत , शंकर म्हेत्रे,  ज्ञानेश्वर दाते, शुभम खामकर, सतीश दाते आदींनी विशेष परिश्रम घेतले,  कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल बागडे यांनी तर सूत्रसंचालन शंकर खामकर यांनी केले. तर आभार ज्ञानेश्वर दाते यांनी मानले.

 
Top