परंडा (प्रतिनिधी)- अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ अर्थिक मदत करावी अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांच्या मागदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने येथील तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परंडा शहरासह तालुक्यात प्रचंड वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडला आहे. या मध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागा व अनेक पिकांचे तसेच शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे परंडा शहर व तालुक्यात विजपुखठा वारंवार खंडीत होत आहे. तो लवकरात लवकर सुरूळीत करावा यासाठी संबंधित विभागाला निर्देश देण्यात यावेत. असे तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,घनश्याम शिंदे,गणीभाई हावरे, नागनाथ थोरात, दयानंद बनसोडे, संतोष लोंढे, कृष्णा चौधरी, ज्ञानेश्वर काळे, सुदाम काळे, योगेश आदलिंगे, मनोज काळे, श्रीहरी चव्हाण, दादा जाधव, तुकाराम ओहाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.