धाराशिव (प्रतिनिधी)- देश, जात, धर्म, संस्कृती यांच्या रक्षणासाठी महाराणा प्रताप सिंहांनी सर्वस्वाचा त्याग केला. देशाच्या इतिहासात त्यांचे मोठे योगदान आहे. असे मत विकासक, उद्योजक दिनेशसिंह परदेशी यांनी व्यक्त केले. धाराशिव येथे महाराणा प्रताप सिंह चौकामध्ये दि. 29 मे रोजी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. चौकामध्ये महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला परदेशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जयंतीच्या निमित्ताने महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्याला उजाळा देताना दिनेश सिंह परदेशी म्हणाले, अनेक लहान, छोट्या प्रांतातील राजांनी महाराणा प्रताप यांना त्यांच्या राज्यात राहण्याची विनंती केली. परंतु मेवाडची भूमी मुघलांच्या वर्चस्वापासून वाचवण्यासाठी महाराणा प्रताप यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत मेवाड मुक्त होत नाही तोपर्यंत ते राजवाडे सोडून जंगलात राहतील. स्वादिष्ट अन्नाचा त्याग करुन मुळे आणि फळांनी पोट भरतील. परंतु अकबराची सत्ता कधीही स्वीकारणार नाही असे सांगितले होते. जयंती कार्यक्रम प्रसंगी जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक भगतसिंह गहेरवार, धाराशिव येथील व्यावसायिक बोरा,राजेशसिंह परदेशी, शिवरत्न तोर,पांडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top