भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील राजूबाई नारायण ढवळे यांच्या गट नंबर 37 मध्ये प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सोलार पंप 2022 मध्ये बसवण्यात आला होता. या पंपाचा दैनंदिन जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी ते वापर करीत होते. मात्र झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसात दोन प्लेट सुटून त्या फ्रेम मधून उडून गेल्या आहेत. त्यामुळे याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राजूभाई नारायण ढवळे यांच्याकडुन करण्यात येत आहे.

 
Top