भूम (प्रतिनिधी)- बाल वयात साहित्य लेखनाची लागलेली रुची भविष्यात मोठ वैभव निर्माण करून देणारी असते असे मत बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तात्यासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले .
गुरुवार दि . 3 एप्रिल 2025 रोजी भूम येथिल जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संस्था पुणे तालुका शाखा भूम व जनसेवा ग्रामीण विकास संस्था उळूप तालुका भूमच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय बालकुमार मराठी साहित्य संमेलन आदर्श मुख्याध्यापक तात्यासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले . या साहित्य संमेलनाला भूम, वाशी, कळंब तालुक्यातील बालकुमार साहित्यिकासह ज्येष्ठ साहित्यिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
या साहित्य संमेलनात ऊन, वारा , पाऊस, आई, वडील, निसर्ग, शेती अशा वेगवेगळ्या विषयाला हात घालून बाल साहित्यिकानी आपल्या स्वरचित काव्य सादरीकरण करून उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, या संमेलनातून काव्य वाचन केलेल्या प्रत्येक बालकवीला आयोजकांच्यावतीने सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरित्र असलेल्या पुस्तकांची भेट देण्यात आली .
याशिवाय प्रथम समता ठाणांबीर, व्दीतीय प्रांजल खैत्रे, तृतीय आकांक्षा थोरात यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन तर समृद्धी म्हेत्रे , मयुरी जाधव व वैष्णवी शेळके यां बालकवींना उत्तेजनार्थ म्हणून सन्मानीत केले .
बालकुमार मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन म्हणून धर्मदत अरुण अण्णा शाळू महाराज, ज्येष्ठ साहित्यिक आश्रुबा कोठावळे कळंब , ॲड विलास पवार कवित्री सौ संध्याराणी कोल्हे कळंब, सौ आशा राऊत कवयित्री कळंब , गोकुळ गायकवाड जामखेड यांची उपस्थिती होती.
साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा .अलका सपकाळ, नवकवी पत्रकार शंकर खामकर यांच्या बरोबरच आलिम शेख सर , अंबादास देशपांडे, ह भ प अरुण काळे महाराज, श्रीमती अंजली सुतार , हरिदास पंडित, माजी सैनिक संघटना तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख व दत्तात्रय काळे, शितल राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अलका सपकाळ, सूत्रसंचालन अलीम शेख सर यांनी केले तर आभार नवकवी शंकर खामकर यांनी मानले .