भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील पेठ विभागातील सिद्धिविनायक मंदिराजवळ गोडाऊन मध्ये शॉर्टसर्किटमुळे रात्री 1:30 वाजता आग लागून एक ते सव्वा कोटी रुपयाचा किमतीचा जीवनावश्यक वस्तूंचा आगीमध्ये जळून व्यापाऱ्याचे नुकसान झाले आहे.

येथील पेठ विभागातील समाधान एजन्सी ,समृद्धी एजन्सी व सुमित एजन्सी अशा समाधान राजेंद्र खराडे यांचे गोदाम आहे. रात्री शॉर्टसर्किटने गोदामा मध्ये आग लागली त्यावेळी गोदामामध्ये ठेवलेले चहा , मसाले ,डिटर्जंट , पापड ,उदबत्ती पुढे व इतर जीवनावश्यक वस्तूचा साठा ठेवलेला होता .अंदाजे सर्व साठा मिळवून एक ते सव्वा कोटी रुपयांपर्यंत चा सर्व कंपन्यांचा मिळून जीवनावश्यक वस्तूंचा साठा आगीमध्ये भस्मसात झाला असल्याचे ग्राम विकास अधिकारी यांनी केलेल्या पंचनामे मध्ये खराडे यांनी सांगितले आहे .रात्री आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली .त्यानंतर आग आटोक्यात आली.परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी फवारल्यामुळे डिटर्जंट चा माल असल्यामुळे तो पूर्णपणे खराब झाला व नष्ट झाला.त्यामुळे तेही नुकसान झाले.


 
Top