तुळजापूर (प्रतिनिधी)-  प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कै नारायणराजे गवळी यांच्या स्मरणार्थ विजय सर गंगणे मित्र मंडळ व शशी आप्पा ज्योत यांच्यावतीने  भाविक व ग्रामीण भागातील तहानलेल्या भक्त ग्रामस्थांना थंड जार पाण्याची पाणपोई व शरबत वाटप उपक्रम शुभारंभ माजी नगरसेवक राजेश शिंदे व  नगरसेवक दयानंद हिबारे यांच्या शुभहस्ते मंगळवार दि. 22 एप्रिल रोजी करण्यात आले. या पुढे दर मंगळवारी लिंबू सरबत हे वाटप करण्यात येणार आहे  यावेळी विजय गंगणे,प्रकाश मगर, मनोज गवळी , किरण कदम, ओनील हंगरगेकर, किरण चव्हाण, अंदेश वाघमारे, तातिक कदम , दिगंबर जाधव, उत्कर्ष डोंगरे श्री सुशांत हत्तीकर. आप्पाराव भालेकर, विक्रम मंठाळकर, गोपाळ गवळी आधी उपस्थित होते.

 
Top