धाराशिव (प्रतिनिधी)-  ग्राम विकास विभागाने जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी आरक्षण निश्चित केले आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम,1964 मधील नियम 2-अ व शासन अधिसूचना क्र.87,दिनांक 5 मार्च 2025 नुसार ही प्रक्रिया केली जात आहे.

तालुक्यातील अनुसूचित जाती, जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी तसेच त्या-त्या जाती,जमाती व प्रवर्गातील महिलांसाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार आरक्षण निश्चित केले आहे.

आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी स्थानिक वृत्तपत्रातून व दवंडीव्दारे व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश आहेत.या कार्यक्रमासाठी खासदार,आमदार तसेच सर्व राजकीय पक्षांच्या तालुका अध्यक्षांना निमंत्रण देणे बंधनकारक आहे. आरक्षण कार्यक्रमाची चित्रफीत तयार करून तसेच उपस्थितांची स्वाक्षरीसह संपूर्ण कार्यवाहीचे दस्तावेजीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहे.

 
Top