उमरगा (प्रतिनिधी)- धम्मामध्ये तुम्ही सुद्धा पंचशीलधारी झाले पाहिजे. तुम्ही सुद्धा अष्टशील दिल पाहिजे. शील,समाधी प्रज्ञा हे तत्त्वज्ञ मूळ बुद्धाच्या धम्माची इमारत आहे. त्याचा गाभा म्हणजे समाधी आहे आणि त्याचा कळस म्हणजे प्रज्ञा आहे. मनाची शुद्धता म्हणजे त्याची समाधी आहे. एकाग्रता शांती ही समाधी आहे आणि त्याच्यातून मिळणारे जे अशुद्ध शुद्ध ज्ञान आहे अशा पद्धतीत धम्माच ज्ञान निर्माण होते. असे भंतेजी पय्यानंदथेरो यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील कराळी येथे शनिवारी दि. 22 मार्च रोजी दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट व भन्ते सुमंगल यांच्या पुढाकाराने आयोजित सातव्या धम्मपरिषदेस भंतेजी पय्यानंद थेरो यांनी संबोधित केले. यावेळी उदघाटक म्हणुन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे तर कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे हे होते. धम्मपीठावर भंतेजी धम्मसार, भंतेजी सुमेध नागसेन, भंतेजी कश्यप,भंतेजी अमरज्योती,भंतेजी सुमंगल,भंतेजी विनयशील,स्वागतध्यक्ष दिलीप भालेराव, ट्रस्टचे अध्यक्ष विलास खिल्लारे, अनु.जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, ट्रस्टचे उपाध्यक्ष मच्छिंद्र सरपे,सचिव संजय ओव्हळ, डॉ.कमलाकर कांबळे, आबासाहेब साबळे,डॉ.श्रीकांत गायकवाड,एस के चेले,विजय वाघमारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक व मार्गदर्शक माजी मंत्री संजय बनसोडे यांनी या कपिलवस्तु बुद्धविहाराच्या चालू कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी सर्व प्रयत्न करू. तसेच हे धम्मज्ञानाचे, धम्म प्रचार व प्रसारचे प्रमुख केंद्र व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. अध्यक्षीय समारोप कैलास शिंदे यांनी धम्म परिषदेच्या आयोजनाचा उद्धेश विषद केला. यावेळी भन्तेजी धम्मसार,भंतेजी सुमेध नागसेन, विलास खिल्लारे, डॉ. कमलाकर कांबळे,डॉ.श्रीकांत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागतध्यक्ष दिलीप भालेराव यांनी प्रास्ताविक केले. धम्ममित्र जी.एल. कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. तर एम. एस. सरपे यांनी आभार मानले. परिषदेस तालुक्यासह सिमावर्ती परिसरातील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.