भूम (प्रतिनिधी)- वडिलोपार्जित मिळकतीमध्ये हिस्सा मागणी केला असता तो न देता दंडमशाही करून न्याय हक्का पासून वंचित ठेवत असल्या प्रकरणात प्रशासनाने सहकार्य करावे. माझे हक्क मला मिळवून द्यावेत. अशी मागणी दत्तात्रय दगडू मुंडे यांनी आपली कर्म कहाणी व्यक्त करताना पत्रकार व प्रशासन अधिकारी यांचेकडे केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती की,  दत्तात्रय दगडू मुंडे हे हिवर्डा तालुका भूम येथील रहिवासी असून त्यांच्या वडिलांनी दोन महिलेशी घरोबा केला होता.  यामध्ये दोन्ही महिलेंना मुले, मुली झाली. कालांतराने एका पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतरही कालांतराने कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला. यामुळे अर्जदाराला कळत नकळत उपजीविकेसाठी भटकंती करावी लागली.  म्हणून भटकंती करत करत दीर्घकाळ गेला. अखेर परिस्थितीची जाणीव झाल्याने गावी परतल्यानंतर वडिलोपार्जित मिळकतीमध्ये हक्क मिळावा यासाठी नातेवाईकाकडे, सावत्र भावाकडे मागणी केली असता वेळ काढूपणा करून वंचित ठेवले. 

परिणामी वडिलोपार्जित मिळकत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि निवेदकाला जगण्याचे साधन नसल्यामुळे कायदेशीरपणे वडिलोपार्जित मिळतीमधील हिस्सा मिळावा यासाठी दत्तात्रय दगडू मुंडे हे 10 मार्च 2025 रोजी पासून भूम तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते.  याची दखल घेऊन प्रशासनाने वेळ मारून नेण्यासाठी कारवाही करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही.  यामुळे  मिळतीमधील हक्कापासून वंचित रहावे लागत आहे. संपूर्ण मिळकत ही एकट्या सावत्र भावाने बळकवली आहे. यातील काही मिळकत सावत्र भावाने पैशाच्या मोबदल्यात इतरांना व्यवहार करून विक्री देखील केली आहे. त्यातून मोठी रक्कम घेऊन खर्च केले आहे. निवेदकाला कसलाही मोबदला दिलेला नाही.

अखेर महागाईच्या तुलनेत नोकरी नसल्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ भागवण्या एवढे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे वडिलोपार्जित मिळकत मिळावी.  या संदर्भात वरिष्ठांना निवेदन दिली. परंतु आध्यापी कसल्या प्रकारचा प्रतिसाद अधिकाऱ्यांकडून मिळालेला नाही. यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणात गांभीर्य विचारात घेऊन तात्काळ मला माझ्या मयत वडिलोपार्जित मिळकती मधील हिस्सा मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा केलेली आहे. परिणामी प्रशासनाने बेदखलपणा केल्यास भुकेने व्याकूळ होऊन जगण्यापेक्षा आत्महत्येच्या माध्यमातून आयुष्याचा शेवट करणे हाच पर्याय राहील., तो मार्ग अवलंबण्याची वेळ माझ्यावर प्रशासनाने येऊ देऊ नये म्हणून अशा प्रकरणात लवकरात लवकर न्याय द्यावा. मिळकतीत वाटा मिळून जावा अशी अपेक्षा दत्तात्रय दगडू मुंडे यांनी आयोजित पत्रकारांसमोर आपल्या आयुष्याची कर्म कहानी व्यक्त करताना मांडली आहे.

 
Top