कळंब (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सुरु असलेल्या गुढी पाडवा प्रवेश वाढवा या अभियानाचे विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी कौतुक केले.
धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या संकल्पनेतून मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष व प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12 मार्च पासून संपूर्ण जिल्ह्यात “गुढी पाडवा प्रवेश वाढवा“ हे अभियान सुरु आहे. या अभियानात प्रत्येक गावात जनजागृती साठी प्रवेश दिंडी काढण्यात आली. घरोघरी जाऊन इयत्ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे प्राथमिक शाळेत तात्पुरते प्रवेश घेण्यात आले असून कांही ठिकाणी इयत्ता 1 पाहिलीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. तर राहिलेल्या ठिकाणी आज 1 एप्रिल पासून सुरु होत आहेत.
विधिमंडळ अधिवेशन काळात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना या अभियानाची माहिती मिळाल्यावर मंत्री भुसे यांनी अधिवेशन काळात विधिमंडळाच्या सभागृहात या अभियानाचे कौतुक करू अभिनंदन केले. हे गुढी पाडवा, प्रवेश वाढवा अभियान यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, राज्य चिटणीस भक्तराज दिवाने, कार्याध्यक्ष व्यंकट पोतदार, कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे, धनाजी मुळे,अर्जुन गुंजाळ,राहुल भंडारे,संजीवन तांबे, संतोष मोळवने, सचिन राऊत सुदर्शन जावळे, प्रशांत घुटे, विजय ओवांडकर,शिवाजी शिंदे, बालाजी पडवळ, उमेश भोसले, प्रदीप म्हेत्रे, बालाजी माळी सुनील सूर्यवंशी, शेषराव राठोड, ज्ञानेश्वर देवाराम, शरद नवले यांच्यासह शिक्षक संघाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.