कळंब ( प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ३० मार्च २०२५ रोजी हभप भारत महाराज शेळके,गावचे सरपंच अमोल पाटील,विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय पाटील यांच्या हस्ते कै. तुकाराम निवृत्ती बंडगर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर बंडगर यांच्या संकल्पनेतून यंदाच्या उन्हाळ्यामध्ये जनतेसाठी मोफत जार द्वारे पाणपोईच्या माध्यमातून थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. उन्हाचा पारा वाढल्याने गावांमधील मुख्य चौकात ही पाणपोई टाकुन जनतेची या माध्यमातून सोय करण्यात आली आहे. या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर शेळके, किशोर शेळके, निलेश माने, महादेव शेळके, शरद शेळके, राजाभाऊ पाटील, गोपाळ शेळके, अंगद माळी, सचिन शेळके, बालाजी चौरे, शिवाजी बोबडे, अनिकेत बंडगर, अजय बंडगर, रोहन बंडगर, ऋतिक बंडगर, चिंटू बंडगर, सुशील पाटील रणजित देशमाने, कुलदीप गावठी,विनोद माने, सतीश माने, विजय कुमार शेळके, महेंद्र कुमार शेळके, शंकर तांदळे, राजेश झोरी, शहाजी शेळके, अश्रूबा शेळके, सुनील तांबारे, बाबा बंडगर,सयाजी डोईफोडे,बापु पाटील,यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.