धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव व लातूर जिल्हयातील चौपदरीकरणाकरीता विकासाला गती देण्यासाठी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, भारत सरकारच्या सड़क परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने येडशी ते बोरगाव (काळे) (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63) च्या पेव्ड शोल्डर असलेल्या फोर लेनमध्ये आवश्यक जमिनीचे अधिग्रहण करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे.

.केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, 1956 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून धाराशिव (उस्मानाबाद), कळंब आणि लातूर या भागांतील उप-विभागीय अधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. अधिग्रहीत होणाऱ्या जमिनीचे तपशील:

उपविभागीय अधिकारी, धाराशिव महामार्ग टप्पा: कि.मी. 20.47 ते कि.मी. 35.4 तालुका: धाराशिव, गावे: कसबे तडवळे, दुधगाव, जवळे (दु), येडशी, ढोकी, कोळेगाव, घोगरेवाडी, उपविभागीय अधिकारी, कळंब महामार्ग टप्पा: कि.मी. 35.4 ते कि.मी. 38.8 तालुका: कळंब- गावे: वाठवडा, ढोराळा, उपविभागीय अधिकारी, लातूर महामार्ग टप्पा: कि.मी. 38.8 ते कि.मी. 88.15 तालुका: लातूर- गावे: मुरुड बु, करकट्टा, बोरगाव बु, रामेगाव, मुरुड अकोला, माखरा, शेलगाव (दि.), एरंडगाव, शेलगाव (ज.), वडगांव (ज.)

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या प्रश्नाच्या अनुषंगाने लोकसभेत लोकप्रतिनिधींना दिलेल्या आयोगांचा वापर करत ह्या महामार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनेक वेळा माननीय नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेतली होती. धाराशिव, कळंब आणि लातूर परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग 63 चे चौपदरीकरण हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना आणि व्यापार-उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद आहे. पुढील टप्प्यात काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठीही मी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधणार आहे,“ असे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगितले.

या निर्णयामुळे धाराशिव, कळंब आणि लातूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असून, महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील.

 
Top