कळंब (प्रतिनिधी)- सध्याच्या धावपळीच्या युगात बस चालकाने बसमध्ये आपला परिवार आहे असे समजून, नशा न करता वाहन व्यवस्थित चालवावे व शिस्तीचे पालन करावे. असे मत राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाचे यंत्र अभिंयता सूर्यकांत थोरबोले यांनी कळंब येथे कार्यक्रमात बोलताना  व्यक्त केले.  येथील बस आगारात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे दि. 11 ते 25 जानेवारी  या पंधरवाड्याच्या कालावधीत राज्यभर आयोजन केले जात आहे. 

सदर कार्यक्रमाचे उदघाटन शनिवार दि.11 जानेवारी रोजी दुपारी 11 वाजता कळंब आगारात धाराशिव विभागाचे यंत्र अभियंता सूर्यकांत थोरबोले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कळबं आगाराचे आगार प्रमुख एस. डी. खताळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपयंत्र अभियंता एम. डी. राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पुंडगे, प्रा. मोहन जाधव, कळंब  तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, स्थानक प्रमुख जानराव हे होते. 

यावेळी कार्यक्रमासाठी प्रभाकर झांबरे, वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप, कल्याण कुंभार, दत्ता मुंडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अभिजीत धाकतोडे,  विलास जाधव, नितीन गायकवाड, श्रीमती शिंदे मॅडम, श्रीमती शेख मॅडम चालक वाहक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते. यावेळी सडक सुरक्षा जीवन सुरक्षा सुरक्षितता मोहीम याविषयी मान्यवरांनी वाहक-चालक व प्रवाशांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोरे यांनी केले. तर आभार श्री जानराव यांनी मानले. कार्यक्रमासाठी वाहक चालक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top