तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात गेल्या मागील  चार दिवसांपासून तुळजापूर तालुक्यात  दमदार पाऊस बरसात आहे. तर दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे दोन दिवस तालुका वासियांना सुर्यदर्शन घडले नाही. पावसाचा संततधारे मुळे भाविकांना पावसात देवीदर्शनार्थ जावे लागत आहे.

या पावसाचा संततधारे मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत रिमझीम पावसामुळे गेल्या चार-पाच दिवसापांसून ढगाळ वातावरण असून,  सूर्यदर्शनच नाही. तालुक्यात 24!जुलै2024अखेर पर्यत 420.08मिमि म्हणजे 176.08टक्के पाऊस पडला असून,  बुधवारी गुरुवार संपूर्ण दिवसभर संततधार होती. त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली. तर जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तालुक्यात  19 जुलैपासून पावसाचा जोर वाढला. गेल्या आठवडयातील दोन दिवस सोडले तर पावसाच्या सरी कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. तालुक्यात  आतापर्यंत 420.08 मिलीमिटर पाऊस पडला असून, सर्वच तालुक्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. शहरासह तालुक्यात गेली अनेक दिवसापासून   ढगाळ पावसाळी  वातावरण व पावसामुळे सूर्यदर्शन झालेले नाही. असे वातावरण पिकांवरील रोगराईला आमंत्रण देत आहे. तालुक्यात गेल्या चार पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. काही वेळ पावसाचा जोर थोडा वाढतही आहे. त्यातच पावसामुळे हवेत गारवा वाढला असून नागरिक उबदार कपडयांचा वापर करीत आहेत. तुळजापूर शहरसह तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने शहरात पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. विशेषत: सखल भागात पाणी साचल्याने तेथून नागरिकंना कसरत करावी लागत होती.


तिर्थक्षेञी पावसाची संततधार

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात सर्वाधिक म्हणजे 506.05 मिलीमीटर पाऊस पडला श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येणाऱ्या देविभक्तांना पावसाच्या संततधाराझेलत देवीदर्शनार्थ जावे लागत आहे याचा फटका वृद्ध भाविकांना बसत आहे. शहरात सर्वञ पाणीच पाणी झाले आहे पावसाचा संततधार मुळे  बाजारपेठेतील गर्दी ओसरली आहे.

 
Top