धाराशिव (प्रतिनिधी)- नॅशनल टेस्टिंग एजन्सी (नीट ) यांच्याकडून चार मे  रोजी देशभरात घेण्यात आली होती. या परीक्षा प्रक्रिया बाबत मोठया तक्रारी येत आहेत. अतिशय महत्वाच्या परीक्षेत असा प्रकार होणं हे दुर्देवी आहे. त्यामुळे या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सरकार कडे केली आहे.                                

देशातल्या 571 शहरातील एकूण चार हजार 750 केंद्रावर 24 लाख सहा हजार 79 विद्यार्थ्यांपैकी 23 लाख 31 हजार 297 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल हा 14 जून अपेक्षित असताना संबंधित एजन्सीने या परीक्षेचा निकाल चार जून रोजी जाहीर केला. परीक्षेत देशात 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळाले आहेत. दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांना परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. हरियाणातील एका केंद्रावरील प्रश्न पत्रिका उशिरा दिल्याचे कारण देऊन ग्रेस मार्क दिल्यामुळे चार विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळालेले आहेत.  व्यावसायिक परीक्षा सिस्टिम ऑफ एलिमिनेशनवर आधारित आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 718- 719 असे गुण प्रदान करण्यात आल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये  परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याची शंका व्यक्त केली आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नीटचे महानिदेशक यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 
Top