तुळजापूर - तालुक्यात शहरात कमी प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे तुळजापूर शहराला पाणी पुरवठा करणाया बोरी धरणात/कुरनूर प्रकल्पात उपलब्ध पाणी 5.98 दलघमी इतके आहे. वरीलप्रमाणे उपलब्ध पाणीसाठा हा जून-2024 पर्यत जपून वापरणे आवश्यक असून त्याकरिता पाण्याचे योग्य नियोजन पार्श्वभूमीवर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनानेे घेतला आहे.

बोरी प्रकल्पात  उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस वापरणे आवश्यक असल्याने नियोजनाचा भाग म्हणून दि. 5 मार्च 2024 रोजी शहरातील मंगळवार पेठ भागात व दि. 5 मार्च  2024 रोजी शुक्रवार पेठ भागात पाणी सोडण्यात येईल व त्यानंतर प्रत्येक तीन दिवसाने रोस्टर पद्वतीने पाणी सोडण्यात येईल.

तरी नागरिकांनी प्रशासनामार्फत आव्हान करण्यात येते की, उपलब्ध पाणी साठा जून-2024 पर्यत पुरविणे करिता या पुढील कालावधीत शहरामध्ये दोन दिवसाआड ऐवजी तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी उपलब्ध पाणी जपून वापरून आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी उपलब्ध पाणी जपून वापरावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top