धाराशिव (प्रतिनिधी)-संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, दुध दरवाढ करावी, लाईटची समस्या मिटविण्यात यावी, पिक विमा रक्कम तात्काळ मिळणे तसेच साखर कारखान्याचे वजन काटे डिजिटल करणे या व इतर मागण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली कळंब येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी (दि. 8) राष्टवादी शरद पवार गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्याचे संपूर्ण पीक कर्ज माफ करावे, शेतमजूरांना कामे, नाला खोलीकरण, तलावातील गाळ काढणे, विहीरी पाडणे, पाण्याची व्यवस्था करणे व जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यात याव्यात, गाईच्या दुधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये भाव देवून शेतीपूर्वक दुध धंदा वाचवावा, सन 2022 चा राहीलेला पीक विमा 300.00 कोटीपेक्षा जास्त ताबडतोब मिळावेत, तसेच सन 2023 चा राहीलेल्या 90 हजार शेतकयांना अग्रीम देवून संपूर्ण पीक विमा मिळून सततच्या पावसाचे राहीलेले अनुदान त्वरीत वाटप करावे. साखर कारखान्यानी ऊस वजनकाटे डिजीटल करुन प्रत्यक्ष दर्शनी भागामध्ये स्क्रिनवर लावावे व चालु वजनकाट्याची भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात यावी आदी मागण्या यावेळी आंदोलनात करण्यात आल्या.
यावेळी आंदोलनात ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर, संजय कांबळे, मुसद्दीक काझी, सुरेश टेकाळे, मनोहर हरकर, आबासाहेब आडसुळ, रमेश देशमुख, औदुंबर धोंगडे, तुषार वाघमारे, रणजित वरपे, ॲड. प्रविण शिंदे, विठ्ठल माने, भारत शिंदे, सागर चिंचकर, अरुण पवार, बाळासाहेब कथले, डॉ. जोगदंड, नारायण शिंदे, भाऊसाहेब शिंदे, प्रकाश मुंदडा, भाऊसाहेब पाटील, सिध्देश्वर घोगरे, नासेर शेख, किशोर आवाड, बबन काळदाते, सुनंदा भोसले, शोभाताई मस्के, सौदागरताई, आत्माराम बिक्कड, आर. डी. कोकाटे, महंमद चाऊस, पालकर, पांडुरंग जाधव, श्री. गाढवे, लालासाहेब थोरवे, भरत गरड आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.