तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला ओबीसी कोट्यातुन आरक्षण देण्यासाठी शासन कर्त्यांना सदबुध्दी असे साकडे श्री तुळजाभवानी मातेस घालुन मशाल श्रीतुळजाभवानी मंदिरात प्रज्वलित करुन महाद्वार येथे महाआरती करून माहोळ येथील नागेश पवार मंञालय मुंबईकडे रवाना झाले.

यापुर्वी उध्दव ठाकरे मुखमंञी असताना ही नागेश पवार यांनी मराठा आरक्षणसाठी पायी चालत जावुन मुखमंञी  उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले होते. सध्या मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या चालू असलेल्या मराठा आरक्षणा आंदोलन पार्श्वभूमीवर पुनश्च मराठा आरक्षण आंदोलनाने उचल खाली असुन, मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ही याञा काढण्यात येत असल्याचे यावेळी नागेश पवार मोहोळ यांनी      सांगितले. तुळजापूर ते मंत्रालय मुंबई हे बावीस दिवस चालत जाऊन मुख्यमंत्र्यांना पाठिंबाचे निवेदन देऊन मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे  अशी मागणी यावेळी करणार आहेत. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा तुळजापूर यांच्यावतीने नागेश पवार यांचे स्वागत करून महाआरती करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित अजय साळुंखे, अर्जुन साळुंखे, आबा कापसे, महेश गवळी, विकास वाघमारे, सत्यजित साठे, कुमार टोले, जीवन अमृतराव, लल्ला साळुंखे, धोंडीबा वीर, सह समाज बांधव उपस्थित होते.


 
Top