परंडा (प्रतिनिधी) - राज्य व केंद्र सरकारची शेती व शेतकरी यांच्याबद्दल अनास्था असून शेती व शेतकरी देशोधडीला लागले आहेत.वाढत्या महागाई बरोबर शेतमालाचे भाव त्या पटीत वाढत नसल्याने व सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याने शेती डबघाईला आली असून शेतकरी आत्महत्या करत आहेत.हे दिवस बदलण्यासाठी शेतकर्‍यांना जागृत करणे गरजेचे आहे त्यामुळे  माजी खा.राजू शेट्टी यांच्या आदेशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जन जागृती अभियान धाराशिव जिल्ह्यात आठ ही तालुक्यात हे अभियान राबवण्यात येणार असून दि. 4 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे समारोप होणार आहे.

सोनारी येथील श्री काळ भैरवनाथ गुरुगादीचे महंतपीर शामनाथ महाराज यांचे हस्ते श्री भैरवनाथ चरणी श्रीफळ फोडून या अभियानास सुरुवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष इंगळे, उच्चाधिकार समिती सदस्य बिभीषन भैरट, संपर्क प्रमुख ईश्वर गायकवाड, जिल्हा पक्षाध्यक्ष तानाजी पाटील, परंडा तालुका अध्यक्ष शंकर घोगरे यांच्यासह रामेश्वर नेटके. ता. पक्षाध्यक्ष  शिवाजी ठवरे ता. युवाध्यक्ष, उप सरपंच अंगद फरतडे, नितीन गाढवे, विलास खोसरे, सुनील गुळमीरे, भारत वायकर, भारत ईटकर, धनाजी पेंदे, गुरुदास भोजने, राजाभाऊ हाके, भूम तालुका अध्यक्ष अमृत भोरे, हभप परमेश्वर घोगरे, बिभीषण काशीदयांचे सह स्वभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अंबी पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. हंगे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळासाहेब होडशीळ यांचे सह.मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


 
Top