धाराशिव (प्रतिऩीधी) :- धारुर येथे शनिवारी मराठवाडा जन विकास संघाचे संस्थापक: अध्यक्ष वृक्षमित्र राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अरुण  पवार यांच्या  प्रेरणेने व लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले सकाळी ठीक  वाजता भैरवनाथ मंदिर येथे  सुरुवात करण्यात आली  तसेच मंदिर परिसर भैरवनाथ मंदिर येथील पुरातन काळातील जुना बारव (विहीर) पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छ करण्यात आला. या विहिरीमध्ये रश्शीच्या साह्याने सामाजिक बांधिलकी जपत विहिरीमध्ये 50 फूट खोल  खाली उतरून सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार आणि श्रीराम कदम या दोघांनी धाडसाने विहिरीमध्ये उतरून सर्व कचरा जमा करून विहीर स्वच्छ करण्यात मोलाचे योगदान दिले तसेच विहिरीमध्ये पाणी नसताना सुद्धा एक कासव जिवंत आढळून आला त्यास पाणी असलेल्या दुसर्‍या विहिरीमध्ये सोडून जीवनदान देण्यात आले तसेच मंदिर परिसर मध्ये  यात्रेदरम्यान झालेला केरकचरा कार्यकर्त्यांनी गोळा करून त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली त्यादरम्यान झाडावरील तहानलेल्या एका माकडाला देखील  अरुण बापूंच्या सूचनेनुसार बकेटमध्ये पाणी ठेवण्यात आले तर आणलेल्या माकडाने ते पाणी आनंदाने पिले व माकडांची तहान भागवली.तसेच मागील दहा बारा वर्षांपासून गावात व धारूर ते तुळजापूर बायपास पर्यंत च्या हजारो झाडानां दररोज टँकरद्वारे पाणी देणे हे कामे नित्यनियमाने चालु आहेत. धारूर गावातील लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला  यावेळी उपस्थित मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण  पवार तसेच लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार समाजसेवक रत्नाकर खांडेकर सर डॉक्टर अण्णासाहेब गरड जगन्नाथ महाराज प्रदीप कदम महेश गडदे विशाल पवार अभिजीत कामटे बालाजी गुरव  सोमनाथ कोरे जयसिंग पाटील श्रीराम कदम महेश गुरव बाळासाहेब कोरे अमर पाटील हरी पवार काका पाटील लक्ष्मण कोनाले पांडुरंग लोहार याबरोबर गावातील युवक वर्गाने मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला.


 
Top