धाराशिव / प्रतिनिधी-

 तालुक्यातील कसबे तडवळे येथील कळंब रोड रेल्वे स्टेशनला सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, या मागणीसाठी रेल्वे आंदोलन परिषदवतीने परिषदेचे अध्यक्ष व‌ मार्गदर्शक कोंडाप्पा कोरे यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन दि.२ मार्च रोजी करण्यात आले.

धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथे इंग्रजांच्या काळापासून म्हणजेच १९०५ या ठिकाणी रेल्वे थांबा देण्यात आलेला आहे. तर २००६ पूर्वी नॅरो गेज रेल्वे होती. मात्र २००६ नंतर ब्रॉडगेज रेल्वे सुरु झाल्यापासून या ठिकाणचा थांबा बंद करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी ज्या ठिकाणी जो दर्जा दिलेला आहे तो तसाच ठेवून सर्व रेल्वे थांबे सुरू ठेवावेत असे सांगितले होते. या रेल्वे स्थानकाला सी दर्जा दिलेला असताना देखील या ठिकाणी रेल्वे थांबवली जात नाही. या रेल्वे स्थानकाशी निगडित परिसरातील ५० गावातील शेतकरी, व्यापारी व नागरिक यांचे व्यवहार निगडित आहेत. या रेल्वे स्थानकाचे उत्पन्न ३६ हजार रुपयांचे होते. तसेच रेल्वे बोर्डाच्या तिकीट यादीवर कळंब रोडचे नाव आहे. मात्र अधिकारी प्रवाशांना या ठिकाणचे तिकीटच देत नाहीत होऊन रेल्वे रूळ, स्लीपर व खडी आदी साहित्य या रेल्वे स्टेशनवर आलेले होते. परंतू ते साहित्य व मटेरियल राजकीय दडपणाखाली दुसरीकडे नेण्यात आलेले आहे. यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मागणी केली असता त्यांनी नक्की थांबा देण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र अद्यापपर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही. तसेच रेल्वे विभागाच्या संबंधित सर्व कार्यालयाकडे वारंवार निवेदने व पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मागणी केली. मात्र अद्याप कोणत्याच कार्यालयाकडून कोणतेही लेखी उत्तर आलेले नाही. निष्ठुर व अन्यायी रेल्वे अधिकारी याबाबत मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करीत नसल्यामुळे हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

यावेळी तानाजी जमाले, तुळशीदास जमाले, डॉ. धनंजय करंजकर, उपसरपंच प्रताप करंजकर, तेजस भालेराव, गणेश करंजकर, विशाल जमाले, अमोल निकाळजे, दादासाहेब भालेराव, सुनील होळेकर, विनायक भालेराव, बाबासाहेब भालेराव, देविदास करंजकर, शरद होगले, भगवान होगले, शरद होगले, सकाहरी पंडित, सुभाष धनके, मिलिंद जोशी, पप्पू बारबोले, शंकर कांबळे, दिलीप पानढवळे, बलभीम काळे, किशोर कदम, अर्जुन वाकळे, धर्म ढमे, बालाजी नाईकनवरे, शंकर गायकवाड, भीमा कुंभार, विजयसिंह जमाले, हारुण शेख, संजय वाघ, वैभव भालेराव, महादेव भडके, दिगंबर लांडगे, अजित निकाळजे, हरिश्चंद्र भडके, शिवाजी शिंदे, बाबू कोरे, महादेव गायकवाड, रामचंद्र जमाले, जगन्नाथ सदावर्ते, आलम कोतवाल, केतन कदम, महेबूब तांबोळी, अरबाज तांबोळी, फरीद पठाण, महम्मद तांबोळी, बालाजी सावंत, मानाजी होगले, शहाजी मुळूक, गजेंद्र जमाले, निशांत कांबळे, दादा कांबळे, शिवा कोरे, मुख्तार शेख, प्रभाकर ढमे, समाधान देडे, धनाजी कोरे, इस्माईल पठाण, माणिक घोडके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top