तुळजापूर / प्रतिनिधी-
तुळजापूर तालुका काटगांव येथे प्रतिवर्ष प्रमाणे यावर्षी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी काटगावचे ग्रामदैवत सय्यद वली यांचं उरूसचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा पंच कमिटी च्या वतीने सांगण्यात आले. तसेच दिनांक 7 फेब्रुवारी रोजी संदल मिरवणूक चा कार्यक्रम तर 8 तारखेला फटाका्यांची आतिषबाजी ( दारू उडवण्याचा ) तर 9 तारखेला जियारत व अन्नदान महाप्रसाद चे आयोजन केले असून तरी सर्व तालुक्यातील व गावातील भाविक भक्तांनी ह्या उरूसच लाभ घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.