तुळजापुर / प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी दर्शनार्थ नाताळ सुट्यांन पार्श्वभूमीवर भाविक खाजगी वाहनांनी मोठ्या संखेने रविवारी आल्याने व वाहन ठेकेदार वाहनतळ पावती फाडून वाहने थेट शहरात सोडत असल्याने रविवारी वाहतुक नियोजन अभावी शहरात रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. याचा ञास भाविकांना मंदीरात दर्शनार्थ जाताना व दर्शन करुन येताना झाल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील वाहतुक नियोजन वाहनतळ ठेकेदारा कडे द्यावी,अशी मागणी होत आहे.