तुळजापूर / प्रतिनिधी-
नगरपरिषदची महावितरणची चालु दोन महिन्याची पाणी पुरवठा वीज थकबाकी थकल्याने महावितरने बुधवार दि. १२रोजी विज कनेक्शन बंद केली होते. या प्रकरणी नगरपरिषदने जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली असता जिल्हाधिकारी यांनी महावितरणला सांगितले की, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी सहा महिन्या पासुन प्राप्त झाला नसुन पंधरावा वित्त आयोग निधी प्राप्त होताच पैसे भरण्याचे आदेश दिले ,असल्याने पाणीपुरवठा विज कनेक्शन जोडावे असे आदेशित केले होते.त्यानंतर आता पाणीपुरवठा शुरू करण्यात आला आहे.
शनिवारी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना भेटुन संंबंधीत वरीष्ठ अिधकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सचिन रोचकरी, आनंद कंदले, पंडीत जगदाळे उपस्थितीत होते.