उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासठी नागरिकांनी आपल्या घरांवर, आस्थापनांवर आणि दुकानांवर तिरंगा लावून तसेच या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत श्री.दिवेगावकर बोलत होते.यावेळी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,  उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,जिल्हा ग्रामविकास यंत्रणेच्या संचालक प्रांजल शिंदे, उपजिल्हाधिकारी(सा.प्र) अविनाश कोरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डी के पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हालकुडे,तहसीलदार गणेश माळी, तहसीलदार प्रवीण पांडे आदी उपस्थित होते.


 
Top