उस्मानाबाद /प्रतिनिधी

 दि. 31 ऑगस्ट ते दि. 09 सप्टेंबर या कालावधीत साजरा होणारा गणेशोत्सवाचे अनुषंगाने जिल्हयात सामाजिक सलोखा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी  या दृष्टिने  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत,   निवासी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचे अध्यक्षतेखाली  मध्यवर्ती शासकिय इमारत, उस्मानाबाद येथील सभागृहात शांतता समितीचे बैठकिचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उस्मानाबाद पंचायत समिती, नगरपरिषद, महावितरण, बांधकाम विभाग या विभागांचे अधिकारी, उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, जिल्ह्यातील शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळाचे सदस्य व प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

 जिल्ह्यात हजारोंच्या संखेने सार्वजनिक गणेश मंडळे मुर्ती स्थापना करुन सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. परंतु काही प्रसंगी अति उत्सहाच्या भरात काही समाज विघातक आक्षेपार्ह देखावे उभारत असल्याने त्यातून सामाजिक ऐक्य व शांतता यास बाधा होण्याची शक्यता असते. तरी सर्व सार्वजनिक मंडळांनी आक्षेपार्ह देखावे न उभारता समाज सुधारणेचे व प्रबोधनाचे देखावे उभारावेत. सार्वजनिक मंडळांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंदणी करुन आवश्यकता असल्यास ध्वनीक्षेपक परवाने मोफत प्राप्त करुन घ्यावेत. मंडप उभारताना व मिरवणुक प्रसंगी वाहतुक नियमांचे पालन, ध्वनी प्रदुषण, पाणी प्रदुषण यांना आळा घालुन पर्यावरण पुरक गणेशोत्सव या संकल्पनेसह  ‘एक गाव एक गणपती’ / ‘एक गल्ली एक गणपती’/ ‘एक वॉर्ड एक गणपती’  इत्यादी संकल्पना राबवाव्यात. गणेशोत्सव दरम्यान सर्व नागरीकांनी सतर्क रहावे, कोणी धार्मीक भावना दुखावनार नाहित, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा अफवा पसरवु नयेत. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित जनतेस केले आह

 
Top